Skip to main content

नभोवाणीची बात



रेडीओ आणि श्रोता यांच्यातील मानवी दुवा..माईक कॉम्स मध्ये हिटलरने संघटक आणि प्रचारक यांची नेमकी कामे काय असतात, हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात प्रचारकाविषयी तो म्हणतो बहुसंख्य माणसे मानसिकदृष्ट्या आळसी आणि भिरू असतात, ती निष्क्रिय असल्यामुळे एखाद्या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवण्याचा साधासा प्रयत्न करणे एवढेच त्याच्यासाठी पुरेसे असते. प्रचारकाचे- प्रोपगंडीस्टाचे काम हेच, कि आपल्या चळवळीला असे नवनवे अनुयायी मिळतील हे त्याने न थकता पहायचे.
         पण असे अनुयायी मिळाल्यानंतर थांबून चालत नसते त्यांना सतत त्या मार्गावर ठेवणे आवश्क असते. लोकांच्या मनावर, डोळ्यांवर कानावर आदळत राहिला पाहिजे. तोही एकतर्फी एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू असताच कामा नये वायमार रिपब्लिकन नेत्यांनी राष्ट्राची दुर्गती केली म्हणजे दुर्गतीच केली. त्यांनाही काही चांगल्या गोष्टी केल्या असतील असे चुकुनसुद्धा म्हणायचे नाही. कारण चांगला प्रोपगंडा तोच, कि जिथे लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याला वावच ठेवलेला नसतो.हिटलर म्हणतो – प्रत्येक प्रकारच्या प्रोपगंडाची पहिली अटच ही आहे,कि आपल्या समोरच्या कोणत्याही समस्येबाबत आपला दुष्टीकोन व्यवस्थितपणे एक पक्षीय एकाच बाजूला असाच असला पाहिजे. सत्य जर विरोधकांच्या बाजूचे असेल,तर त्याचा उच्चारही करता कामा नये.आधुनिक वैज्ञानिक प्रगतीने या प्रोपगंडासाठी दोन सर्वोत्तम माध्यमे दिली.एक रेडीओ.दोन चित्रपट.
                  रेडीओ हे यातील सर्वात परिणामकारक मध्यम.तेव्हा अजून घरात दूरचित्रवाणी संच आलेले नव्हते, त्यामुळे चित्रपट पहायचे तर त्यासाठी उठून चित्रपटगृहातच जावे लागणार. दुसरे मध्यम वृत्तपत्रांचे तर अनेक जण वृत्तपत्रे वाचतच नाहीत.पुन्हा त्यातील मजकूर समजुन घ्यायचा तर त्यासठी किमान विचार साक्षरता हवी. एकोणिसाव्या शतकात मुद्रितमाध्यमांचे जे स्थान, तेच विसाव्या शतकात रेडिओचे आहे. त्यामुळे नाझींची सत्ता आल्यानंतर गोबेल्सने नभोवाणी प्रक्षेपणाचे सगळे अधिकार त्याच्या प्रोपगंडा मंत्रालयाकडे घेतले.आता नभोवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कायर्क्रमाचे स्वरूप कोणतेही असो, त्यांची विषयवस्तू असे ती राष्ट्र आणि राष्ट्रप्रमुखाविषयीचा, आर्य वंशविषयाचा अभिमान रेडीओचा वापर करीत असताना नाझी प्रोपगंडातज्ञांच्या लक्षात एक बाब आली होत, कि वक्ता आणि श्रोता यांतील मानवी बंध नाही.
                      नाझी सत्तेने लोकांच्या हाती रेडीओ दिले खरे पण त्यावरून काय ऐकायचे याचे अधिकार मात्र स्वत:कडेच ठेवले.येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे; कि फॉरेस्ट व्यवस्तित प्रोपगंडा हा हिंसेसा पर्याय नसतो.तो हिंसेसाच एक भाग असतो.नाझी जर्मनीत सरकार मान्यता प्राप्त नभोवाणी केंद्रे सोडून अन्य काहीही ऐकले. उदा. बीबीसी सारखी परकी केंद्रे, तर त्यांची शिक्षा एकच होतो छळछावणीत रवानगी पण त्याच वेळी नाझी नभोवाणीचे प्रक्षेपण अन्य देशांतही करण्यात येत होते.त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाचा हेतू एकच असे, शत्रूराष्ट्रात अपमाहिती पसरवणे, शत्रूसैनिकांचे मनोधैय खच्ची करणे.जर्मन रेडीओवरून सादर केला जाणारा होम स्वीट हा कार्यक्रम हे त्याचे एक उदाहरण. अमेरिका सैनिकांना उद्देशून तो कायेक्रम केला जाई. अशा प्रकारे विविध मालिका सादर केल्या जात. 















Comments

Popular posts from this blog

Rangnath Swami (Nazrekar)

रंगनाथस्वामी निगडीकर हे  समर्थ पंचायनातले  एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा  शिवाजी  महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे. रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे  नाझरे  गावचे कुलकर्णी होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत.  कल्याणी  गावचे  पूर्णानंद  हे  सहजानंदांचे  शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदा...

भोग

मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंव्हा दुःखाचा भोग! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात कि, भोंगे घडे त्याग!   त्यागें अंगा येती भोग !! ऐसे उफराटे वर्म!   धर्मा अंगी चं अधर्म !! देव अंतरे ते पाप! खोटे उगवा संकल्प !! तुका म्हणजे भीड खोटी ! लाभ विचारावा पोटी!! संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय त्यांच्या या अभंगात असे सांगत आहेत कि, एखादा मनुष्य प्रपंच्यातील विषय भोग घेता असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्या विषयाचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो, म्हणजे एखाद्य वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करणे सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंव्हा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो याचाच अर्थ असा कि, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग सम...